मराठा आरक्षणावरून बीड येथे झालेल्या हिंसाचाराची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार

    15-Dec-2023
Total Views | 37
SIT Enqiry on Maratha Reservation Related Violence

नागपूर :
बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्च्यानंतर झालेल्या हिंसाचाराची विशेष पोलीस पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. यासाठी दोन दिवसांत विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. या हिंसाचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने जाळले होते. आमदार संदीप क्षीरसागर यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.

पोलिसांनी जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. जमावाला प्रारंभीच अडवले असते, तर पुढील दुर्घटना घडली नसती. पोलिसांची संख्या अपुरी होती, तर अन्य जिल्ह्यातून पोलीस साहाय्य घ्यायला हवे होते. हा हिंसाचार नियोजनबद्ध होता, असा आरोप करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी याविषयी अन्वेषणाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनीही या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘दुर्घटनेच्या ठिकाणी पोलिसांच्या तुलनेत जमावाची संख्या अधिक होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली असती, तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती. हिंसाचार वेगवेगळ्या ठिकाणी घडला. यामध्ये काही लोक ३-४ ठिकाणी दिसत आहेत. आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये ३० आरोपी सराईत आहेत. अद्यापही माजलगाव येथील ४०, तर बीड येथील ६१ आरोपी सापडलेले नाहीत. अटक झालेल्यांच्या विरोधात सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. अटक करण्यात आलेल्या प्रत्येकाचे ‘मोबाईल लोकेशन’ही पडताळण्यात आले आहे. या दुर्घटनेतील ‘मास्टर माईंड’ कोण आहे, याचे अन्वेषण होत आहे. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. कारवाईपासून आम्ही मागे हटणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षातील असले तरी आरोपींवर कारवाई केली जाईल’.
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेस नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121