शिपाई होण्यासाठी इंजिनीअर्सची लांबलचक रांग; सर्वाधिक साक्षरता असणाऱ्या केरळमध्ये बेरोजगारीने तरुण हैराण!

    28-Oct-2023
Total Views | 122
Engineers line up for 'cycle test' to become peons in Kerala

तिरुवनंतपुरम : देशातील सर्वाधिक साक्षर राज्य म्हणटल्या जाणाऱ्या केरळमध्ये राज्य सरकारने शिपाई पदासाठी भरती सुरु केली आहे. २३ हजार रुपये प्रति महिना पगार असलेल्या या नोकरीसाठी किमान पात्रता ७ वी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे.तसेच शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना सायकल चालवता येणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दि. २७ ऑक्टोबर रोजी या पदासाठी अर्ज करण्यासाठी रांगच रांग पाहायला मिळाली. यातील अनेक उमेदवारांकडे अभियांत्रिकीच्या पदव्याही होत्या.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०१ उमेदवारांनी सायकलिंगची चाचणी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यात बी.टेक पदवी घेतलेले उमेदवारही होते. दरम्यान एका एका अभियांत्रिकी पदवीधारकाने शिपायाची सरकारी नोकरी सुरक्षित असल्याचे सांगितले.

बी.टेक पदवी असून ही केरळमध्ये ११ हजार रुपयांची नोकरी करावी लागत असल्याचेही काही उमेदवारांनी सांगितले. त्यात ही त्यांना फार श्रम करावे लागतात. त्यामुळे अभियांत्रिकीसोबतच अनेक मोठ्या पदव्या असून ही उमेदवार शिपाई पदासाठी अर्ज करत आहेत. खरं तर, तरुण सरकारी नोकऱ्यांना सुरक्षित मानत आहेत, ज्यामध्ये नोकरी गमावण्याचा धोका नाही.

दरम्यान प्रशांत नावाच्या एका तरुणाने सांगितले की, तो कोचीमध्ये कॅफे चालवत होता. मात्र आता त्याला शिपायाची नोकरी मिळाल्याने तो आंनदीत आहे. त्याला आशा आहे की त्याला वीज विभाग KSEB मध्ये नियुक्ती मिळेल, जिथे त्याला दरमहा सुमारे ३० हजार रुपये पगार मिळेल. मात्र शिपाई पदासाठी या नोकरीचे मूळ वेतन २३ हजार प्रति महिना असल्याचे सांगितले जात आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121