नवी दिल्ली : विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. यासामन्यात भारताने पाकचा दारुण पराभव केला होता. या सामन्यादरम्यान, स्टेडियमवर प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली होती.
दरम्यान, भारताचा मध्यमगती गोलंदाज इरफान पठाणने एक किस्सा शेअर केलाय. तो म्हणतोय, "आम्ही पेशावरमध्ये खेळत होतो तेव्हा एका चाहत्याने माझ्यावर एक खिळा फेकला, जो माझ्या डोळ्याच्या खाली लागला. मला गंभीर दुखापत झाली असती. तेव्हा सामना १० मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता, पण आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही, कारण आम्हाला चांगला खेळ करावयाचा होता. आणि त्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली होती.
तसेच, इरफान पुढे म्हणाला, या सामन्याच्या पराभवानंतर भारतीय प्रेक्षकांवर राग काढल्याबद्दल मी पाकिस्तानला फटकारले, तर, पेशावरमधील सामन्यात आपल्याबरोबर डोळ्यात खिळा मारल्याचा प्रसंग घडला होता, असे त्याने सांगितले. दरम्यान, वर्ल्ड कपदरम्यान, चाहत्यांच्या वागणुकीबाबत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रार केली आहे. यावर प्रश्न उपस्थित करताना भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानमध्ये खेळताना त्याच्यावर खिळा फेकण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.
१९ ऑक्टोबरला रोजी पुण्यात झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात समालोचन करताना पठाणने हा खुलासा केला होता. तो म्हणाला, “आम्ही पेशावरमध्ये खेळत होतो तेव्हा एका चाहत्याने माझ्यावर खिळा फेकला, जो माझ्या डोळ्याखाली लागला. मी गंभीर जखमी होऊ शकलो असतो. सामना १० मिनिटे थांबवण्यात आला होता, पण आम्ही चांगले क्रिकेट खेळत असल्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. तो पुढे म्हणाला, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) भारतीय प्रेक्षकांची तक्रार करण्यापूर्वी स्वतःच्या कारभारात लक्ष घालावे. यामुळे खेळाडूंच्या भावना दुखावल्या जाणार होत्या.
१४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध झालेल्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार केली होती. पाकिस्तानी खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असताना काही चाहत्यांनी धार्मिक घोषणा दिल्याचे सांगण्यात आले. यामुळे खेळाडूंच्या भावना दुखावल्या जाणार होत्या, असेही म्हटले गेले होते.