मोठी बातमी! विशाखापट्टणम असणार नवी राजधानी

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

    31-Jan-2023
Total Views | 166
Visakhapatnam


नवी दिल्ली
: विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली. आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबत मोठा निर्णय जगन मोहन रेड्डी सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल. रेड्डी हे मंगळवारी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या पूर्वतयारी बैठकीत बोलत होते.

रेड्डी म्हणाले, "मी तुम्हा सर्व गुंतवणूकदारांना विशाखापट्टणम येथे आमंत्रित करू इच्छितो. जी येत्या काही दिवसांत आपल्या राज्याची राजधानी असणार आहे. काही महिन्यांनी मी स्वतः विशाखापट्टणमला रहायला जाणार आहे. सध्या आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती आहे. यापूर्वी, जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने गतवर्षात नोव्हेंबरमध्ये आंध्र प्रदेश

वादग्रस्त आंध्र प्रदेश विकेंद्रीकरण आणि सर्व क्षेत्रांचा समावेशी विकास कायदा २०२० रद्द केला होता. राज्यात तीन राजधानी बनवण्याचा त्याचा उद्देश होता. त्यानंतर राज्य सरकारने विशाखापट्टणम (कार्यकारी राजधानी), अमरावती (विधानिक राजधानी) आणि कुर्नूल (न्यायिक राजधानी) प्रस्तावित केले.


अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121