'नव्या भविष्याचा सूर्योदय': शत्रूला धडकी भरवणाऱ्या आयएनएस विक्रांतची अशी आहे भव्यता

    02-Sep-2022
Total Views | 144
Navy
 
 
 
 
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. २ सप्टेंबर रोजी 'आयएनएस विक्रांत' या स्वदेशी युद्धनौकेचे उद्घाटन केले. कोचीन शिपयार्ड येथे हा भव्य समारंभ पार पडला. आयएनएस विक्रांत ही २६२ मीटर लांब आणि २६ मीटर रुंद असलेली ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आहे.
 
या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आयएनएस विक्रांत हे भारत सरकारच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनविण्याच्या प्रयत्नांचे उदाहरण आहे. आणि देशाला स्वदेशी विमानवाहू जहाजे बनवणाऱ्या निवडक राष्ट्रांच्या गटाचा भाग बनवले आहे. त्यांनी भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हाचे अनावरण देखील केले ज्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा शाही शिक्का आहे. सध्या, फक्त काही राष्ट्रांकडे विमानवाहू जहाजे तयार करण्याची क्षमता आहे. आज आयएनएस विक्रांतच्या कार्यान्वित झाल्यामुळे भारत अशा देशांचा एक भाग बनला आहे. तज्ज्ञ आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विक्रांतच्या माध्यमातून भारताने स्वावलंबनाची क्षमता दाखवून दिली आहे.
 
आयएनएस विक्रांतमध्ये १४ डेक आणि २,३०० कंपार्टमेंट असून महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष केबिन आहेत. हे जहाज १७०० कर्मचारी वाहून नेऊ शकते. आयएनएस विक्रांतचा कमाल वेग सुमारे २८ नॉट्स आणि क्रूझिंग स्पीड १८ नॉट्स आहे. आयएनएस विक्रांतचे बांधकाम २००९ मध्ये सरकारी मालकीच्या कोचीन शिपयार्डमध्ये सुरू झाले. भारतीय नौदलाच्या मते, ५०हून अधिक भारतीय उत्पादक या प्रकल्पात प्रत्यक्ष सहभागी होते आणि ४० हजारहून अधिक लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121