मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीयच आहे. अर्थात तरीही भारतीयांना या योगदानाचे आणि क्रांतिकारकांचे महत्त्व अधिकाधिक समजावे, कळावे आणि त्यादृष्टीने त्यांचे स्मरण करीत, त्यांच्या संबंधातील महत्त्वाच्या घटनांना आपल्या दृष्टीने आणि कल्पनेतून जिवंत करीत ते मनातील सारं काही चित्रांद्वारे कागदावर रेखाटत, उतरवीत, रंगवीत एका वेगळ्या पद्धतीने आठवणींचा जागर करावा. ज्याद्वारे आपल्या क्रांतिकारकांबद्दल आदरभाव व्यक्त करावा ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्यांचे मोलही नव्या पिढीला समजावे, या भावनेतून अखिल भारतीय स्तरावरील एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे १६ लाख रुपयांची पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. निर्माण प्रतिष्ठान या स्पर्धेचे आयोजक असून पुण्याच्या भारतीय विद्यापीठाचा कला विभाग सहयोगी आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत ही स्पर्धा असून १ ऑगस्टपर्यंत स्पर्धकांना आपली चित्रे पाठवायची आहेत.
आठ गटामध्ये ही स्पर्धा होणार असून इयत्ता १ ली १० वी पर्यंत आणि वय वर्षे ५१ पर्यंतचे तसेच त्यावरील वयोगटाचे स्पर्धकही यामध्ये सहभागी होऊ शकतील. ऑईल पेटींग, वॉटर कलर, अॅक्रेलीक आणि स्केच या माध्यमात चित्रे पाठवता येणार आहेत. प्रत्येक ग्रुपसाठी १० पारितोषिके देण्यात येणार असून त्यासोबतच २५ विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिके आणि डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धकांनाही सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेनंतर देशातील काही मुख्य शहरांमध्ये स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी विषय खालीलपैकी निवडावयाचे आहेत.
१) भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील कोणतीही घटना किंवा व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्त्वे
२) भारताच्या क्रांतिकारी चळवळीतील कोणतीही घटना किंवा व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्त्वे
३) १९४७, १९६२, १९७१ आणि १९९९ च्या भारतीय लष्कराने लढलेल्या युद्धादरम्यानची कोणतीही घटना किंवा व्यक्तिमत्त्व/व्यक्तिमत्त्वे
स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपली चित्रे ही चित्रकलेसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदावर काढावयाची आहेत. त्यासाठी असणारा आकार म्हणजे १/४ ड्रॉइंग शीट, किंवा कार्टिज पेपर असावा ( त्याचा आकार २७.५ सेमी बाय ३७.५ सेमी इतका असेल)
स्पर्धेसाठी एकंदर ८ गट असून त्यांना सवलतीने स्पर्धा-प्रवेशमूल्यही ठरविण्यात आले आहे.
त्यानुसार गट, वय निकष आणि स्पर्धा-प्रवेशमूल्य खालील प्रमाणे आहेत.
गट १ - इयत्ता पहिली ते चौथी , रुपये २५/-
गट २- इयत्ता ५ वी ते ७ वी, रुपये २५/-
गट ३- इयत्ता ८ वी ते १० वी, रुपये २५/-
गट ४ वय २१ वर्षाखालील, रुपये १००/-
गट ५. वय ३१ वर्षांखाली, रुपये १००/-
गट ६. वय ४१ वर्षांखाली, रुपये १००/-
गट ७. वय ५१ वर्षांखाली, रुपये १००/-
गट ८. वय ५१ वर्षांवर, रुपये १००/-
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागेल त्यासाठी खालील वेबसाईटवर भेट द्यावी.
वेबसाईट - www.weoneevents.com या वेबसाईटवर जाऊन सहभागी होण्यासाठी तेथे आपले नाव रजिस्टर करावे लागेल. नाव, पत्ता तेथे रजिस्टर (नोंदणी) केल्यानंतर आपल्या चित्राची हार्ड कॉपी पुणे आणि मुंबई येथे पाठवावी लागेल. वेबसाईटवर जाण्यासाठी htpp://rb.gy/iruonc या लिंकवर जावे.
चित्राची हार्ड कॉपी पाठवण्यासाठी संपर्क -
पुणे पत्ता - ऑफबीट डेस्टिनेशन, ६ नेस्टकोन क्राऊन, १३८९ शुक्रवार पेठ, संगम साडी सेंटरच्या मागे, ऑफ बाजीराव रोड, पुणे ४११००२. मोबाईल क्रमांक - ८७६६०९७८८५.
मुंबई पत्ता - गुरू एंटरप्रायजेस, २३ त्रिमूर्ती कृपा, टिळक मंदिर रोड, पोस्ट ऑफिसजवळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७. मोबाईल ९०८२३७५३८३.