शाहपूरमधून दोन सशस्त्र शिकारी ताब्यात

वनविभागाची कारवाई

    26-Jul-2022
Total Views | 51
hunter
 
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या दहिवली गावाजवळील वन क्षेत्रात सशस्त्र शिरकाव केल्याबद्दल दोन आरोपींना दि. २२ जुलै अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक सिंगल बोर बंदूक आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच वन विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
 
 
वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार दोन माणसे शिकार करण्याच्या हेतूने वन क्षेत्रात गेल्याचे लक्षात आले. गस्तीवर असलेल्या वनक्षेत्रपालांनी या माणसाना अडवून त्यांची चौकशी केली. चौकशी अंती, शिकारीच्या हेतू ने जंगलात फिरत असल्याचे त्यांनी काबुल केले. गुरुदेव डाकी आणि शंकर शिद असे अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपींना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. पुढिल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी करित आहेत. या कारवाईमध्ये वन विभागाचे संदिप जाधव, चंद्रप्रकाश मौर्या, रामहरी तांबडे, भाऊराव भांगरे, धुलंगुंडे, वनरक्षक खैरे व वाहनचालक भरत निचिते उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121