मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकराच्या आयुष्य कमी करणं : फडणवीस
21-Jul-2022
Total Views | 51
56
मुंबई: महाराष्ट्र सरकारने मेट्रो ३ साठी मुंबईतील आरे मिल्क कॉलनीत कारशेड बांधण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. पर्यावरण वाद्यांच्या आदर आहे; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर कोणी काम थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामगे सदहेतू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हा निर्णय मुंबईकरांच्या हिताचा निर्णय आहे. रोज लोकल ट्रेनच्या गर्दीत गुदमरणारा मुंबईकर या मेट्रो प्रकल्पामुळे मोकळेपणाने प्रवास करू शकणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणी नुसार, कापल्या जाणाऱ्या झाडांच्या जीवनकाळामध्ये जेवढे कार्बन उत्सर्जन रोखू शकेले असते, तेवढे कार्बन उत्सर्जन ही मेट्रो ८० दिवसात रोखेल. या देशात सर्वोच्च न्यायालया पेक्षा मोठे कोणीही नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काम सुरु होऊन २५ टक्के काम होईपर्यंत, कोणतेही आंदोलन झाले नाही. पुढील काम वेगाने होईल. आणि मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरे मिल्क कॉलनीत कारशेड बांधण्यावरील स्थगिती उठवण्यात आली आहे, असे अतिरिक्त मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रमुख भूषण गगराणी यांनी गुरुवारी दि. २१ जुलै रोजी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला आरे येथे कारशेड बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमएमआरसीला देखील कंत्राटदारांना एकत्रित करण्यास सांगितले आहे. यामुळे साइटवर काम पुन्हा सुरू होणार आहे. बुधवारी दि. २० जुलै रोजी नगरविकास विभाग आणि एमएमआरसीमध्ये या विषयावर चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमएमआरसीला देखील कंत्राटदारांना एकत्रित करण्यास सांगितले आहे. यामुळे साइटवर काम लवकरच सुरू होईल.
मेट्रो-३ हा नेव्ही नगर कुलाबा आणि सीप्झ(अंधेरी) यांना जोडणारा महत्वाकांशी प्रकल्प आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकारने आरे कॉलनीमधल्या कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिली होती. आणि हे कारशेड कांजुरमार्गला नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ती आता उठवण्यात आली आहे. मुंबईकरांचा व्यापक हितासाठी हा निर्णय मोठा आहे. यामुळे कारशेडच्या कामाला गती देण्यात येणार आहे.