कोविडकाळात शहर बनले मृत्यूचे ठाणे!

    20-Jun-2022
Total Views | 41

thane
 
 
ठाणे : मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढुन लोकसंख्या २५ लाखाच्या घरात पोहचली आहे. मात्र,तुलनेने गेल्या पाच वर्षांत ठाण्यातील जन्मदर घटला असुन मृत्यु मात्र वाढले आहेत. ठाणे महापालिकेच्या जन्म-मृत्यु विभागाकडील तपशीलानुसार कोविड काळात जन्मनोंदीमध्ये मोठी घट झाली असून मृत्यू नोंदीमध्ये मात्र प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे.   
  
कोविड आजारामुळे स्थलांतरीत झालेले काही नागरीक परतले नाहीत किंवा आजारांच्या धास्तीने अनेकानी आपली कुटुंबे गावाकडेच ठेवल्याने जन्मनोंद घटली असावी.त्याचबरोबर नोकरी- व्यवसायातील अनिश्चततेमुळे तसेच कुटुंब नियोजनाचे महत्व पटल्याने एकच अपत्यावर भर देण्याकडे कल वाढत असल्याचे निरिक्षण तज्ञांकडून व्यक्त होत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये २०२१ मध्ये १९ हजार ४३० जणांच्या जन्माची नोंद झाली असून २०२० च्या तुलनेमध्ये यामध्ये २७७३ इतकी घट झाली आहे.
  
२०१७ पासूनच्या जन्मनोंदीमध्ये घसरण झाल्याचे आढळून येते. २०१७ मध्ये २७ हजार ५५८ जन्मनोंदी झाल्या होता. २०१८ मध्ये त्यात घट होऊन २३ हजार २२० नोंदी झाल्या. परंतु पुढील वर्षी पुन्हा २३ हजार ९८५ इतकी नोंद झाल्याने जन्मनोंदी वाढल्या होत्या. परंतु २०१८च्या तुलनेत ही संख्या अत्यल्प होती. २०१९ मध्ये २३ हजार ९८५ जन्म झाले असून २०२० मध्ये त्यात घट होऊन २०२० मध्ये २२ हजार २०३ तर २०२१ मध्ये ही संख्या १९ हजार ४३० पर्यंत कमी झाली आहे. ठाणे शहरातील जन्मदर घटण्यामागे निरनिराळी कारणे सांगण्यात येत असून कोरोनाचा प्रादूर्भाव हे त्यातील मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे.
 
कोरोनामुळे स्थलांतरीत मजूर गावी गेल्याने त्यांच्याकडून होणारा जन्मनोंदी घटल्या आहेत. तर प्रसुतीसाठी ठाण्यातील माहेरी येणाऱ्या मुलींची संख्या कोरोना प्रादूर्भावामुळे घटल्याने नोंद कमी होत असल्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनांद्वारे मुलांना जन्म देणेही काही दांपत्याकडून टाळण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना काळात ठाण्यातील मृत्यूंची संख्या वाढली असून त्याचा परिणाम मृत्यूनोंदी वाढण्यात झाला आहे.
 
 

thane 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'महाकुंभाभिषेक' हा धार्मिक विधी आयोजित केला जातोय. जवळजवळ २७० वर्षांनंतर हा धार्मिक विधी मंदिरात संपन्न झाला. या विधीसोबतच मंदिरात विश्वक्षेनाची मूर्ती देखील पुनर्प्रस्थापित करण्यात आली. त्यासोबतच तिरुवांबडी श्री कृष्णस्वामी मंदिरात 'अष्टबंधकलशम' नावाचा एक महत्त्वाचा पूजाविधीही केला जाणार असल्याची माहिती आहे. महाकुंभभिषेक हा एक विशेष धार्मिक विधी आहे जो तीर्थस्थळ किंवा मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी केला जातो. ही प्रक्रिया आगम शास्त्रांवर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121