"मुख्यमंत्र्यांची एकच नीती खोटे बोल पण रेटून बोल"

केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

    02-May-2022
Total Views | 77
 
 
keshav
 
मुंबई : "राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकाच नीती आहे खोटे बोल पण रेटून बोल, ही त्यांच्या शिवसेनेची नवी रणनीती आहे" असा थेट आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि केला आहे. सारखे सारखे पैश्यांसाठी केंद्राकडे राज्यसरकार हात पसरते आणि वर केंद्राकडूनच पैसे येत नाहीत असा कांगावही करतेअशी खोचक टीका उपाध्ये यांनी केली आहे.
 
 
 
२०१७- १८ ला जीएसटी लागू झाल्यापासून २०२१ पर्यंत केंद्राकडून राज्याला कुठलाही परतावा येणे बाकी नाही. २०२१- २२ सालचे १३ हजार ६३७ कोटी येणे बाकी आहेत ते या ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारकडे येतील. केंद्राकडून येणाऱ्या पैश्यांवरून राज्य सरकार आकांडतांडव करते पण राज्य सरकारकडूनच कोळसा आणि रेल्वे यांची तब्बल ११ हजार कोटींची देणे आहे त्याबद्दल मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर मंत्री मूग गिळून गप्प का? असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121