मुंबई: देशात सध्या ज्या पद्धतीने अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे त्यामुळे देशाची प्रतिमा अल्पसंख्यांकविरोधी बनत आहे अशी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. गुरुवारी टाईम्स नेटवर्क इंडिया कॉनक्लेव्ह मध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. भारतीय कंपन्यांना देशाच्या या प्रतिमेचा त्रास होऊ शकतो असेही ते म्हणाले.
दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये बेकायदेशीर बांधकामांवर झालेल्या कारवाईच्या घटनेवरून त्यांनी हे वक्तव्य केले आहे. देशातील गरीब अल्पसंख्य लोकांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते त्यावरून इतर राष्ट्रे त्या देशाबद्दल आपले मत तयार करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची अशी प्रतिमा होणे हे आपल्याला नुकसानकारक होऊ शकते असे विधान त्यांनी केले.