कोकणातील कातळशिल्पांचा 'युनेस्को'च्या यादीत समावेश

    02-Apr-2022
Total Views | 147

Katalshilp 3
 (प्रातिनिधिक)
 
 
 
रत्नागिरी : कोकणातील विस्तीर्ण अशा कातळांवर कोरण्यात आलेल्या अश्मयुगीन शिल्पांचा शुक्रवार, दि. २५ मार्च रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान प्राप्त झाले. भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातील आणखी तीन स्थळांचा समावेश झाला आहे. येत्या काही दिवसांत या कातळशिल्पाचे तीन स्तरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाकडून सर्वेक्षण करण्यात येईल, त्यानंतर केंद्रीय पुरातत्वीय सर्वेक्षण होईल आणि शेवटी युनेस्कोच्या अधिकाऱ्यांकडून याचे सर्वेक्षण आणि तपासणी होईल.
 
 
 
कुठे आहेत ही कातळशिल्पं...
१) रत्नागिरी (ता. राजापूर) : कशेळी, रुंधेतळी, बारसू, देवी हसोळ, देवाचे गोठणे
२) रत्नागिरी : जांभरूण, उक्षी
३) सिंधुदुर्ग (ता. मालवण) : कुडोपी
४) गोवा (ता. दक्षिण गोवा) : फणसाईमल
 

Katalshilp 1 
 (प्रातिनिधिक)
 
 
गेल्यावर्षी युनेस्कोच्या यादीत गड किल्ल्यांचा समावेश झाला होता. यावर्षी कोकणातील कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी पुरातत्व विभागाकडून कातळशिल्पांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार युनेस्कोने जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत समावेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कातळशिल्पे साधारण २० वर्षे जुनी असून अश्मयुगीन आणि ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना म्हणू याकडे पाहिले जाते. या कातळ कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी रत्नागिरीमध्ये सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, ऋत्विज आपटे आदी निसर्गयात्री या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.



Katalshilp 2
  (प्रातिनिधिक)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121