Asia Cup 2023: टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही!

बीसीसीआयच्या निर्णयावर साईद अनवरचा जळफळाट

    19-Oct-2022
Total Views |
आशिया कप २०२३
नवी दिल्ली  ( Asia Cup 2023 ) : आशिया चषक २०२३ साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नसल्याची घोषणा क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केली. २००८ साली टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या नापाक कारवायांमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले.परिणामी  भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करणे टाळले. आशिया चषक २०२३ मालिकेसाठी पाकिस्तानात जाऊन खेळण्यास असहमती दर्शवल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला.  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वरने पाकिस्ताननेही आगामी वर्ल्डकप मालिकेसाठी भारतात जाऊ नये, असे वक्तव्य केले आहे.
 
जय शाह BCCI सचिव असण्याव्यतिरिक्त एशिया क्रिकेट कौन्सिल (ACC) चे अध्यक्ष देखील आहेत. एसीसी सचिव या नात्याने त्यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी ( Asia Cup 2023 ) पाकिस्तानला जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यावेळी भारतीय संघ  पाकिस्तानात जाऊ शकत नाही व पाकिस्तानचा संघ भारतात क्रिकेट खेळायला नेणार नाही. त्यामुळे या पेचातून मार्ग काढण्यासाठी एखाद्या त्रयस्थ ठिकाणी हा सामना खेळवण्याविषयी तोडगा  सुचवला.
 
 
परंतु भारताच्या या निर्णयामुळे ( Asia Cup 2023 ) पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झालेला आहे. भारत आशिया कप मालिकेसाठी पाकिस्तानात यायला तयार नसल्यास, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील २०२३ साली भारतात खेळवली जाणारी आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा इतरत्र खेळवली जावी, या संबंधी आयसीसीकडे मागणी करावी, असे वक्तव्य पाकिस्तानच्या सईद अन्वरने केले.
 
सईद अन्वरने ट्विट केले की, "जेव्हा सर्व आंतरराष्ट्रीय संघ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पाकिस्तान सुपर लीग (PSL) खेळण्यासाठी पाकिस्तानात येतात, तेव्हा BCCI ला काय अडचण आहे? जर BCCI आशिया चषक २०२३ ( Asia Cup 2023 ) इतरत्र हलवण्याची मागणी करत असेल, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पुढील वर्षी भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक देखील इतरत्र हलवला जावा, यासाठी प्रयत्न करावेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121