दहशतवादाविरोधात जगाने एकजूट होण्याची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- इंटरपोल महासभेत संबोधन

    18-Oct-2022
Total Views | 35
 
नरेंद्र मोदी
 
 
 
 
नवी दिल्ली : भारत आणि इंटरपोल या दोघांसाठी सध्याचा काळ अतिशय महत्वाचा आहे. जगापुढे दहशतवादाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे दहशतवादाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकजूट होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
 
इंटरपोलची ९० वी महासभा भारतात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महासभेत संबोधित केले. ते म्हणाले, भारत सध्या मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. हा आपल्या संस्कृतीचा, लोकांचा आणि कर्तृत्वाचा उत्सव आहे. त्याचवेळी जगाच्या दृष्टीनेही सध्याचा कालखंड अतिशय महत्वाचा आहे. सध्या जगापुढे दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी अशी अनेक आव्हाने आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी जगाला सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. सुरक्षित जग हे प्रत्येक देशाचे प्राधान्य असायला हवे. त्यामुळे या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र यावे लागेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
 
विविधता आणि लोकशाही यशस्वी करण्यासाठी भारत हे जगासाठी उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सैन्य पाठवण्यात भारत हा सर्वोच्च योगदान देणारा देश आहे. भारतीय पोलीस दल ९०० हून अधिक राष्ट्रीय आणि १० हजार राज्यांच्या कायद्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी करते. त्यामुळे जागतिक शांततेच्या इंटरपोलच्या धोरणामध्येही भारत मोठे योगदान देत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
 
दरम्यान, इंटरपोलच्या सर्वसाधारण सभेला १९५ इंटरपोल सदस्य देशांचे शिष्टमंडळ सहभागी झाले आहे. यामध्ये मंत्री, देशांचे पोलीस प्रमुख, राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. इंटरपोलच्या आमसभेच्या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन शिष्टमंडळेही आली आहेत.
  
दाऊदच्या हस्तांतरणाचा प्रश्न पाकिस्तानी अधिकाऱ्याने टाळला
 
इंटरपोलच्या महासभेमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसिन बट भारतात आले आहे. त्यांना सध्या पाकिस्तानात असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यास भारताकडे सोपविण्याची प्रक्रिया पाक सुरू करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मणिपूर पुन्हा पेटलं! आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, जमावबंदी लागू; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

मणिपूर पुन्हा पेटलं! आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, जमावबंदी लागू; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

(Manipur Tense Over the Arrest of Arambai Tenggol Leader) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नाही. राज्यातून हिंसाचाराच्या बातम्या वेळोवेळी येत राहतात. आता मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराची लाट उसळली आहे. यामुळे इंफाळसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर विष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ..

लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या

लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे आंदोलन चिघळले; ४४ जण ताब्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे स्थलांतरित समुदाय आणि यूएस इमिग्रेशन व कस्टम्स एन्फोर्समेंट यांच्यातील संघर्ष हिंसक वळणावर गेल्याचे निदर्शनास येते आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेले निदर्शन हाताळणे कठीण होत चालल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी, निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक आणि फटाके फेकले. संपूर्ण परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्तपणे नॅशनल गार्ड तैनात केल्यानंतर निदर्शनांना हिंसक वळण आल्याचे समोर येते आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121