केरळ कोविड अपयशाचे खापर ओणमवर!

केरळमध्ये सलग चौथ्या दिवशी ३० हजारांहून अधिक रुग्ण

    29-Aug-2021
Total Views | 227

पिनराई विजयन _1 &nbs


नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ४५,०८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३५,४८० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ६८ हजार ५५८ इतकी आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर सध्या ९७.५३ टक्के इतका आहे. मात्र केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री पिरनाई विजयन यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. केरळमध्ये सलग चौथ्या दिवशी ३० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले.

केरळसह महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोनासंबंधी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कालावधी वाढवून ३० सप्टेंबरपर्यंत केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात आत्तापर्यंत ६३ कोटी ९ लाख १७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ओणम पूर्वीपासूनच केरळच्या रुग्णांचा वाढता आलेख सातत्याने वाढत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. कोविडचा केरळ पॅटर्न फोल झाल्याबद्दलची चर्चा झाली. ज्यावेळी रुग्णवाढ झाली त्यानंतर केंद्र सरकारने पथकही रवाना केले होते.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121