अपघात कमी करण्यासाठी ‘सेफ्टी ऑडिट’ अनिवार्य - नितीन गडकरी

    06-Jul-2021
Total Views |

nitin gadkari_1 &nbs


केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींची घोषणा

नवी दिल्ली : “अपघात कमी करण्यासाठी, रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यांवर ‘सेफ्टी ऑडिट’ करणे अनिवार्य करण्यात येणार आहे,” असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग नितीन गडकरी यांनी सोमवार, दि. ५ जुलै रोजी जाहीर केले.व्हेहिकल क्रॅश सेफ्टी’ या विषयावर दृक्श्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे आणि दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, ज्याचे प्रमाण ‘कोविड’ मृत्यूंपेक्षा अधिक आहे, असे ते म्हणाले. गडकरी म्हणाले की, “जवळपास ६० टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे असतात.



मोटरसायकल वाहतुकीचे संरक्षण आणि सुरक्षितता ही काळाची गरज आहे. त्यासाठी अपघात कमी करण्यासाठी, रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यावर ‘सेफ्टी ऑडिट’ करणे अनिवार्य करण्यात येणार आहे,” असे त्यांनी जाहीर केले. चालकांना प्रशिक्षण देणे आणि प्रगत प्रशिक्षण संस्था व केंद्रे स्थापन करणे, यावरही सरकारचा भर आहे,” असे ते म्हणाले.
“चांगले रस्ते बनविणे आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा सुधारणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले. “जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व सहभागी घटकांमधील सहकार्य, संवाद आणि समन्वय आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.




अग्रलेख
जरुर वाचा
बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन ..

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

"लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121