मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोनाचे ४०,४१४ नवे रुग़्ण सापडले आहेत.हा आकडा गेल्या आठवड्यापासून सलग वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात धाकधूक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोविड टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात लॉकडाऊन करण्याची शिफारस केली आहे.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांने म्हणाले की राज्यात कलम १४४ किंवा कर्फ्यूने हे काम भागणार नसून यासाठी लॉकडाऊन हा एकमात्र पर्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला त्या संदर्भातील आदेशदेखील दिले आहे. यामुळे येत्या एक दोन दिवसात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गरज पडल्यावर बेड्स संख्या, ऑक्सीजनची उपलब्धता आणि व्हेंटिलेटरचा आढावा घेतला होता. आणि संबंधित विभागाला तसे आदेश दिले आहेत.
बीडमधील’गाढवाची मिरवणूक’ ८० वर्षांनंतर रद्द
कोरोना वाढत्या संक्रमनामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावातील गाढवाची मिरवणूक ८० वर्षात पहिल्यांदा रद्द करण्यात आली आहे. या मिरवणुकीमध्ये गाढवाला रंगवून त्याच्या गळ्यामध्ये चप्पलाची हार घालून त्यावर गावातील एका ‘भाग्यवान‘ जावयाला बसवले जाते आणि संपूर्ण गावात त्याची मिरवणूक काढली जाते. गाढवावर बसणार्या व्यक्तीना बक्षिस म्हणून सोन्याची अंगठी आणि एक नवीन कपड्याचा ड्रेस प्रदान केला जातो. परंतु, जिल्हाधिकार्यांनी गावकरर्यांच्या विनंतीनंतरही तो कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले.
हिंगोलीमध्ये ७ सात दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा हिंगोली जिल्हाधिकारी यांनी केली आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागायच्या आधी हिंगोली लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता बाकी सर्व बंद राहणार आहे. नवे निर्बंध २९ मार्चच्या सकाळी ७ पासून ४ एप्रिलच्या दुपारी १२ वाजेपर्यंत राहणार आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद स्थानिक प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची जाहीर केला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात गेल्या २४ तासात आढळले ४०,४१४ रुग्ण
महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोना संसर्ग रविवारीही कायम होता. प्रशासकीय पातळीवर हा संसर्ग थोपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी कोरोना रुग्णांची संख्या मात्र अजूनही आटोक्यात आलेली नाही. संसर्गाच्या नव्या लाटेत रविवारी विक्रमी ४०,४१४ रुग्ण आढळले, तर १०८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्युदर २% झाला असून रविवारी १७,८७४ रुग्ण बरे होऊन परतले. हा रिकव्हरी रेट ८५.९५% झाला आहे. एकूण आकडेवारी पाहता राज्यात एकूण २७,१३,८७५ नमुने पॉझिटिव्ह आले असून १५,५६,४७६ होम क्वॉरंटाइन आहेत.