ऊर्जामंत्र्यांचा पाय खोलात, चार्टड विमान प्रकरण भोवणार!

    19-Mar-2021
Total Views | 351

nitin raut_1  H



नितीन राऊत यांच्याविरुद्धच्या तक्रारीची केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडून दखल

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीर पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने मागवली आहे. राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून ही माहिती मागवली गेली आहे.



त्यामुळे आता राऊत यांच्या विमान प्रवासावरील खर्चाची राज्य वीज नियामक आयोगानेही चौकशी करावी, अशी मागणी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. पाठक यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात राऊत यांनी वीज कंपन्यांच्या खर्चाने दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाबाबत केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडे तक्रार केली होती.



या संदर्भात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने चारही वीज कंपन्यांकडून राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील मागविला आहे. यामुळे राऊत यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. वीज कंपन्यांचा महसूल आणि त्यांचा खर्च याबाबतीत निर्देश देण्याचा अधिकार असलेल्या राज्य वीज नियामक आयोगानेही राऊत यांच्या बेकायदेशीर खर्चाची चौकशी करावी, अशी मागणीही पाठक यांनी केली.




अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121