राजकारणात प्यादीच मरतात! ; संदीप देशपांडेंचा फिल्मी टोला

    18-Mar-2021
Total Views | 210

Sandeep Deshpande_1 
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरानाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि सचिन वाझे यांना अटक यावरून महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी, चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.
 
 
 
 
 
अशामध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मिर्झापूरमधील एक व्हिडीओ शेअर करत 'मिर्झापुर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात !' असा टोला लगावला आहे. सध्या त्यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.
 
 
 
 
 
याआधी संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या टाळे बंदीवरदेखील प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, "महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच कोरोना वर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतो आहे," असा प्रश्न उपस्थित केला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121