बालसाहित्यिकांनी स्वरचित कविता व कथा पाठवण्याचे आयोजकांचे आवाहन
नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘बालकट्टा’ व ‘बाल आनंद मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस चालणार्या साहित्य संमेलनामध्ये ‘बाल कवी संमेलन’, कथाकथन, बाललेखकांशी संवाद असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बाल मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार असून बालवाचकांमधून बाललेखक घडावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बालकवी कट्ट्यासाठी व कथाकथनासाठी बालसाहित्यकांनी
या ई-मेल आयडीवर आपली स्वरचित कविता व स्वरचित कथा दि.२८ फेब्रुवारीपर्यंत आपले नाव, मोबाईल क्रमांक व पत्त्यासह पाठवावी.
या संमेलनामध्ये ज्या बालकवींची व कथाकारांची निवड होईल त्यांना संमेलनामध्ये कविता व कथा सादर करण्याची संधी मिळेल, असे आवाहन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्यवाह संजय करंजकर, डॉ. शंकर बोर्हाडे, सुभाष पाटील, भगवान हिरे यांच्या कडून करण्यात आले आहे.