भारतीय जवानांनी केला ३ दहशतवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2020
Total Views |

Jammu Kashmir_1 &nbs
नवी दिल्ली : सध्या एकीकडे कोरोनाचे संकट देशावर असताना दुसरीकडे भारतीय सैन्य भारतीय सीमांवर होणार्या कारवायांशी लढा देत आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील खुलचोहर परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या सुरक्षा दल आणि पोलीस यांची संयुक्तपणे शोधमोहीम सुरु आहे.
 
  
जम्मू काश्मीर पोलिसांकडून चेवा उल्लार या गावात दहशतवादी असल्याचा संशय सुरक्षा दलाकडे व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर या कारवाईमध्ये १ एके रायफल आणि २ पिस्तुल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून परिसरात आणखी काही दहशतवादी आहेत का? याचा शोध सुरक्षा दल व पोलिसांकडून घेतला जात आहे. यापूर्वी शुक्रवारी सुरक्षा दल व दहशतवाद्यांच्यात त्राळमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@