महाराष्ट्राचे ४४ भाविक तेहरानमध्ये अडकले

    29-Feb-2020
Total Views |

tehran corona_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यामुळे काही देशांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या देशात वाढू नये म्हणून सीमा बंद केल्या आहेत. यामध्ये इराक व इराणसह तेथील अन्य देशांचा समावेश आहे. यामुळे ६००हून अधिक भारतीय इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ भाविकांचा समावेश आहे.
 
 
सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमधील ४४ भाविक तेहरानमध्ये अडकले
 
 
इराणमध्ये धार्मिक तीर्थयात्रेला गेलेले जवळपास २ हजार मुस्लीम भाविक तेहरानजवळ अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील ४४ भाविकांचा समावेश आहे. या प्रवाशांची तेथून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी धडपड सुरु आहे. भारताने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून इराणमधील विमानांना भारतात उतरण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे सर्व भाविक मागील ८ दिवसांपासून तेहरान परिसरात अडकून पडले आहेत. अकलूज, सांगोला, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागातील ४४ भाविक कोल्हापूर येथील साद ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे धार्मिक यात्रेसाठी गेले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121