बुंदेलखंडला विकासाच्या मार्गावर आणणारा 'बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग' : पंतप्रधान

    29-Feb-2020
Total Views | 53

नरेंद्र मोदी_1  




चित्रकुट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी चित्रकूटच्या १५ हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या २९६ किलोमीटरच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचा शिलान्यास सोहळा पार पडला . फेब्रुवारी २०१८ मध्ये सरकारने जाहीर केलेल्या उत्तरप्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडोरच्या करारामध्ये या महामार्गाच्या निर्माणाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “बुंदेलखंडला विकासाच्या महामार्गावर आणणारा बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग याप्रदेशाचे भविष्य बदलणारा ठरणार आहे. सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा महामार्ग येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल.”




ते पुढे म्हणाले, “यंदाच्या अर्थसंकल्पात यूपी डिफेन्स कॉरिडॉरसाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुंदेलखंड द्रुतगती महामार्गावरून यूपी डिफेन्स कॉरिडोरलाही वेग मिळणार आहे. बुंदेलखंड प्रदेश ‘मेक इन इंडिया’चे खूप मोठे केंद्र होणार आहे. येथे बनवलेल्या वस्तूंची जगभर निर्यातही केली जाईल. जर येथे मोठे कारखाने आले तर जवळपासच्या विस्तीर्ण आणि छोट्या उद्योगांनाही त्याचा फायदा होईल. इथल्या शेतकर्यां नाही याचा फायदा होईल. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढेल.”






उत्तर प्रदेश सरकार बुंदेलखंड द्रुतगती मार्ग तयार करीत आहे, जो चित्रकूट, बांदा, हमीरपूर आणि जालौन जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेस वे बुंदेलखंड प्रदेशाला आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे आणि यमुना द्रुतगती मार्गाने जोडेल. यासह बुंदेलखंडच्या विकासात ही महत्वाची भूमिका बजावेल. २९६ किमी लांबीच्या या एक्स्प्रेसवेचा चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, उरैया आणि इटावा जिल्ह्यांना फायदा होणार आहे. बुंदेलखंड द्रुतगती मार्गासाठी केंद्र सरकार १४८४९.०९ कोटी रुपये खर्च करणार आहे. हा महामार्ग बुंदेलखंड प्रदेशास रस्त्यांच्या माध्यमातून राजधानी दिल्लीशी जोडेल. बुंदेलखंड द्रुतगती महामार्गासाठी ९५.४६ टक्के जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्ण होताच सुमारे ६० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. चित्रकूट ते दिल्ली असा प्रवास बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाने अवघ्या पाच तासात पूर्ण होईल.


अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121