कार्तिकीला पंढपुरात वारकरी, दिंड्या आणि पालख्यांना प्रवेशबंदी

    20-Nov-2020
Total Views |

kartiki ekadshi_1 &n



सोलापूर :
राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत.कार्तिकी एकादशी २६ नोव्हेंबरला आहे. त्याआधीपासून राज्याच्या विविध भागातून पायी दिंड्या पंढरपूरकडे येण्यास निघत असतात. आषाढी यात्रा यंदा होऊ शकली नाही आणि सुमारे आठ महिने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र शासनाने आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेवर निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असा इशारा वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला होता.त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि शासन यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.



कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर शहरासह परिसरातील आठ ये दहा गावांमध्ये संचारबंदी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा बंद राहणार आहेत. २५ आणि २६ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पंढरपूरमध्ये येणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ते २६ नोव्हेंबर रोजी बाहेर गावातून पंढरपूरकडे येणारी सर्व एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक यात्रेच्या पाश्वर्भूमीवर प्रशासनाकडून वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली आहे.


जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी यात्रा सुध्दा प्रतिकात्मक रूपात साजरी करावी. तसेच आषाढी यात्रा पध्दतीने नियम असावे असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. भाविकांनी मात्र कार्तिकी यात्रा रद्द न करता कोविडचे नियम घालून यात्रा करावी अशी मागणी केली होती. वारकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच कार्तिकी वारीच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती.कार्तिकी यात्रेसाठी २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशीला मंदिराच्या वतीने होणारी पाद्य पूजा, नित्य पूजा व शासकीय महापूजेला मर्यादित संख्येने वारकऱ्यांना प्रवेश देण्यास परवानगी मिळावी आणि व कार्तिकी यात्रेत शेकडो वर्षांपासून होत असलेल्या विधी व परंपरा पाळाव्यात यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन ..

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

"लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121