दहशतवाद्यांचा सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला

    04-Jan-2020
Total Views | 38


CRPF_1  H x W:



श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करत ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात स्थानिक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याचवेळी सुरक्षा दलाने परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू केली आहे.


श्रीनगरच्या डाउनटाउन कावदारा भागात आज शनिवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यानंतर परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना काश्मीर खोऱ्यातील वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्थानिक लोकांमध्ये भीती पसरविण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जात आहे.


यापूर्वी काल म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात सैन्याच्या लेफ्टनंटसह चार सैनिक गंभीर जखमी झाले. यासह परिसर घेराव घालून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की
, लष्कराची पेट्रोलिंग टीम सीमावर्ती भागात दौर्‍यावर होती. यावेळी हा स्फोट झाला होता.

अग्रलेख
जरुर वाचा
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल . पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात ..

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121