वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

    24-Jan-2020
Total Views | 178


maharashtra band_1 &


मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीला विरोध दर्शविण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काही भागात हिंसक वळण मिळते आहे. चेंबूर परिसरात बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यात बसचालक जखमी झाला आहे.  वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत इस्टर्न एक्सप्रेस हायवे रोकण्याचा प्रयत्न केला. तसेच घाटकोपर आणि अंधेरीतील स्थानिकांनी रस्त्यावर उतरत याविरोधात निदर्शने केली. 


औरंगाबादमध्येही या बंदला हिंसक वळण मिळाले आहे. वाळूजला जाणाऱ्या सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. यावेळी बसची काच फुटली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच काही लोक बंदला जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी केली.


वंचितने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत जनजीवन सुरळीत असून काही भागात तणावपूर्ण शांतता आहे. अकोला, औरंगाबाद, सोलापूर, हिंगोली याठिकाणी बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. इंदापूरमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदला कुठेही गालबोट लागू नये याकरिता महाराष्ट्र पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121