लंडन : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकड्यांचा चांगलाच तीळपापड झाला हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताशी संबंध तोडण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले, त्याचा फटका पाकिस्तानलाच बसला. अशीच एक कुरापत म्हणजे लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर पाक समर्थकांनी दगडफेक केली. मोठ्या संख्येने जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर अंडी फेकण्यात आली. याबाबत भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबतची तक्रार देखील केली आहे. यावरून पाकिस्तानचा भेकडपणा जगासमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मंगळवारी भारतीय दुतावासासमोर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी जमले होते. त्यांनी कलम ३७० रद्द केल्याने भारतविरोधी घोषणा दिल्या. यादरम्यान इमारतीवर दगडफेक देखील केली. यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून हटविण्यात आले. पाकिस्तानी समर्थकांच्या या कृत्याची माहिती भारतीय दुतावासाने ट्विट करुन दिली आहे. ज्यामध्ये इमारतीच्या काचा फुटलेल्या दिसत आहे. गेल्या महिनाभरात हा पाकिस्तानचा दुसरा भेकड हल्ला आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी देखील पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शने केली होती.
Another violent protest outside the Indian High Commission in London today, 3 September 2019. Damage caused to the premises. @foreignoffice @UKinIndia @MEAIndia @DominicRaab @DrSJaishankar @PMOIndia @tariqahmadbt pic.twitter.com/2sv0Qt1xy8
— India in the UK (@HCI_London) September 3, 2019
कलम ३७० रद्द केल्यानंतर या मुद्द्यावर पाकिस्तान सतत कुरापती सुरू आहे. आपले समर्थन करावे म्हणून पाकिस्तान इतर देशांपुढे हात पसरवत आहे. पण कोणत्याच देशाने पाकिस्तानचे समर्थन केलेले नाही. याऊलट अनेक मुस्लीम देशांनी भारताच्या या निर्णय़ाचे समर्थन केले आहे. त्यामुळे पाकिस्तानी समर्थकांच्या या कुरापतींमध्ये पाकिस्तान सरकारचा हात नाही ना ? असा प्रश्नदेखील आंतरराष्ट्रीय स्थरावर विचारला जात आहे.