सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

    07-Jun-2019
Total Views | 37



 


जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठी कारवाई करत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पुलवामा येथील लस्सीपोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडून चार AK47 रायफली जप्त करण्यात आल्या असून परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच कारणामुळे सुरक्षा दलाने आपली शोध मोहीम सुरूच ठेवली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या जवानांना लस्सीपोरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. माहिती मिळताच ४४ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचा विशेष कारवाई गट आणि सीआरपीएफच्या जवानांनी पुलवामामधील या भागात संयुक्त शोध मोहीम हाती घेतली होती. शोध मोहीम सुरू असतानाच परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतरच्या कारवाईत या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

 

अनंतनागमध्ये जवानाची हत्या

 

अनंतनाग जिल्ह्यात ईद साजरी करण्यासाठी घरी आलेल्या प्रादेशिक सेनेच्या मंजूर अहमद बेग या जवानाची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. बेग काही दिवसांपासून लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्ससोबत काम करत होते. मात्र सध्या ते ईद साजरी करण्यासाठी आपल्या घरी आले होते. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी सादूरा येथील त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल . पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात ..

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121