मुंबईत पहिल्या पावसाचे ३ बळी

    28-Jun-2019
Total Views | 48



मुंबई : शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहर जलमय झाली आहे. अशामध्ये अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच पावसाची स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामध्ये आतापर्यंत शॉक लागून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अंधेरीमध्ये एकाच तर गोरेगावमध्ये दोघांचा समावेश आहे.

 

अंधेरीतील अण्णानगर आरटीओ ऑफिससमोर शॉक लागून काशीमा युडियार (वय ६०) या जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. तर, दुसऱ्या घटनेत गोरेगाव येथे शॉक लागून चार जण जखमी झाले आहेत. या सर्वांना गोरेगावमधील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार पैकी दोघांना मृत घोषित केले. राजेंद्र यादव (वय ६०) आणि संजय यादव (वय २४) अशी मृतांची नावे आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121