नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवादी तळांपैकी पाच ठिकाणे उध्वस्त केल्याची माहीती दिली आहे. भारतीय वायुदलाने जाहीर केलेल्या एका अहवालातून ही माहीती उघड झाली आहे.अहवालानुसार, मिराज २००० या विमानांतून जैशच्या सहा पैकी पाच तळांना लक्ष्य करण्यात आले होते.
सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने पाकिस्तान सर्वोच्च क्षमता असलेल्या वायु रक्षा प्रणालीचा वापर यात केला होता. भारतीय वायुदलाच्या अहवालानुसार, सैन्याकडे उच्च तंत्रज्ञानाची क्षमता असती तर २७ फेब्रुवारी दरम्यान पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावेळी आणखी मोठे नुकसान करणे शक्य झाले असते. या अहवालात २६ फेब्रुवारीला पाकिस्तानातील जैशच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या कारवाईचे विश्लेषण करण्यात आले आहे.
पुलवामाचा बदला घेण्यासाठी भारताने एअर स्ट्राईक केला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. भारतीय वायुदल हे कारगील युद्धानंतर १९९९ पासून आपल्या क्षमतांचा विस्तार करत आहेत. या क्षमता आणखी विस्तारीत करण्याची गरज सध्या आहे, असे हा अहवाल सांगतो. पाकिस्तानी एफ १६ या विमानामुळे पाक वायुदलाची क्षमता वाढली आहे. राफेल विमानांचा सामावेश वायुदलाच्या ताफ्यात झाल्याने भारताची ताकद आणखी वाढेल. या अहवालात वायुदलाच्या गरजेच्या अन्य क्षेपणास्त्रांच्या खरेदीचे मुद्देही मांडण्यात आले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat