उन्नावच्या 'त्या' कन्येची अखेर झुंज अपयशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात पेटवून दिलेल्या पीडितेची अखेर मृत्यूशी झुंज संपली. दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. जामीनावर सुटून आलेल्या आरोपींनी दोन दिवासांपूर्वी रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. त्यात ती ९० टक्क्यांपेक्षा जास्त भाजली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला आहे.

 

रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांतर्फे तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तिला वाचवण्यात अपयश आले. 'मला जगायचे आहे', हे तिच्या तोंडी शेवटचे शब्द होते, अशी माहिती तिच्या भावाने दिली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे.

 

उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर पीडितेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला गेला. ९० टक्क्यांपेक्षा अधिक शरीर भाजल्यानंतरही पीडिता सुमारे एक किलोमीटर चालत गेली होती. गावातील लोकांच्या माहितीनुसार तिने मदतीची याचना केली होती. अशातच तिने स्वतःहून फोन करून पोलिसांना घडला प्रकार सांगितला होता. तिच्या वैद्यकीय चाचणीत शरीरावर मारहाणीचा निशाण नव्हते चाकू किंवा तत्सम धारदार शस्त्राने पीडितेववर हल्ला झाला नव्हता, असे या वैद्यकीय अहवालात निदर्शनास आले होते. पोलिसांनी या प्रकरणात पाचही आरोपींना अटक केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबद्दल कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@