फेब्रुवारी २०१९ पर्यंत ग्राहकांच्या माहितीची पडताळणी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत ९० टक्के मोबाईल वॉलेट्स बंद होण्याची शक्यता पेमेंट्स इंडस्ट्रीमधील तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑप इंडियाकडून या पडताळणीसाठी डेडलाइन ठरविण्यात आली होती. आरबीआयच्या निर्देशानुसार कंपनीने ग्राहकांची माहिती गोळा केली. परंतु त्यात फारसे यश मिळाले नाही. कंपनी आतापर्यंत थोडीच माहिती गोळा करू शकली आहे. पेमेंट्स इंडस्ट्रीमधील एका अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. आतापर्यंत कंपनीने मोबाईल वॉलेट्सची बायोमॅट्रिक पडताळणीदेखील केलेली नाही. त्यामुळे देशातील ९० टक्के मोबाईल वॉलेट्स बंद होऊ शकतात. अशी माहिती नवी दिल्लीतील एका पेमेंट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
खासगी कंपन्यांना ग्राहकांच्या पेपरलेस पडताळणीसाठी आधारच्या डेटाबेसचा वापर करता येणार नाही. असे न्यायालयाने आधारच्या निकालाच्या वेळी म्हटले होते. इकेवायसी करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने केवायसीच्या पर्यायाबदद्ल अधिक माहिती दिलेली नाही. ही डेडलाइन आता काही दिवसांवर आली आहे. असे असताना हे काम फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. चार वर्षांपूर्वी डिजिटल पेमेंटला खूप मागणी होती. पण आता परिस्थिती बदलली असल्याने फोनपे, मोबीक्वीक, अॅमेझॉन पे यांसारख्या कंपन्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस या क्षेत्रात जोर धरताना दिसत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/