पावसाळी अधिवेशनात 'पावसा'ची हजेरी ; अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित

    06-Jul-2018
Total Views | 34

मुसळधार पावसामुळे विधिमंडळसह संपूर्ण नागपूर झाले 'जलयुक्त'  



नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. पावसामुळे विधीमंडळाच्या परिसरामध्ये सर्वत्र पाणी साचल्यामुळे तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


नागपूरमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. विधीमंडळाबरोबरच अधिवेशनासाठी आलेल्या सर्व नेत्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर देखील गुडघाभर पाणी जमा झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे शहरासह विधिमंडळाची देखील वीज सकाळपासून गुल झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने विधीमंडळाचे काम येत्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.


दरम्यान पावसामुळे अधिवेशन स्थगित करण्याची वेळ आल्यामुळे विरोधकांकडून पुन्हा सरकारला यासाठी धारेवर धरले जात आहे. नागपूर प्रशासन आणि फडणवीस सरकारच्या शून्य नियोजनामुळे आज आपल्याला 'जलयुक्त नागपूर' पाहायला मिळत आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांना साधे आपले 'नागपूर' देखील नीट सांभाळता येत नाही का ? असा सवाल काही विरोधक विचारत आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121