विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकणार

    21-Jun-2018
Total Views | 19




आ. निरंजन डावखरे यांना विश्वास

 

पेण : गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार म्हणून केलेली विकासकामे हाच माझ्या कार्याचा अहवाल आहे. आगामी काळात कोकणातील विकास आणि पदवीधरांच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच माझा प्रयत्न आहे. आरोप कोणीही करोत, मी केलेल्या विकासकामांची पोचपावती पदवीधर मतदार मला देऊन पुन्हा आमदार बनवतील,” असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे पेण येथे पदवीधर व कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांना मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

 

या बैठकीत मतदारांना मतदान करण्यासंबंधी साक्षर करण्यासाठीच्या गाईडलाईनदेखील देण्यात आल्या. आ. संजय केळकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, ”देशातील सर्वसामान्य जनतेला तीन हजार आठशे कोटींचे शेती कर्जसाहाय्य तर साडेतीन कोटीहून अधिक सर्वसामान्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या जोडीला राज्यात देवेंद्र फडणवीस यांनीही विकासकामांचा झपाटा लावला. त्यामुळे भाजपचा विजय रोखणे आता विरोधकांना अवघड झाले आहे. येत्या निवडणुकीतही पदवीधर मतदारांनी निरंजन डावखरे यांनाच पहिली पसंती देऊन विजयी करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा आ. प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. या मेळाव्यात पेण तालुका भाजप अध्यक्ष गंगाधर पाटील, विष्णू भाई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121