स्वभाषा ही स्वत्वाची अभिव्यक्ती : सरसंघचालक

    08-Apr-2018
Total Views | 20

न्यायालयीन कामकाजात भारतीय भाषेचा वापर व्हायला हवा : भागवत

 
 
 
नवी दिल्ली : स्वभाषेचा प्रयोग केवळ व्यावहारिक सुविधा नाही तर स्वभाषा ही स्वत्वाची अभिव्यक्ती आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘जनतेला जनतेच्या भाषेतून न्याय’ या विषयावर नुकत्याच आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते. यावेळी संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य, अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
 
‘स्व’ ची अभिव्यक्ती ही केवळ मातृभाषेतूनच शक्य आहे. भाव विदेशी भाषेतून व्यक्त होत नाहीत. लोकव्यवहारात बोलली जाणाऱ्या भाषेचा अनुवाद भाषेच्या भावानुरुप होऊ शकत नाही असे भागवत यावेळी म्हणाले. स्वातंत्र्याच्या आंदोलनात बिरसा मुंडा यांचा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्यासोबत पकडल्या गेलेल्या २४१ मुंडावी भाषा बोलणाऱ्या क्रांतिकारकांना त्यांच्या भाषेचे भाषांतर करणारा न मिळाल्यामुळे न्यायालयात याबद्दल सांगता आले नाही. खरंतर तत्कालीन ब्रिटिश न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यांच्यासोबत अन्याय झाला. तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते मात्र आता तर आपले भारतीयांचे राज्य आहे. न्यायालयांसहित सर्वत्र आपल्याच भाषेत स्वतंत्रपणे आपले म्हणणे मांडता आले पाहिजे असे ते म्हणाले.
 
 
देशात भाषेवरून कधीही संघर्ष झाला नाही
 
भारतात प्राचीन काळापासून इतक्या भाषा असूनही लोकांना निरनिराळ्या प्रांतातील लोकांशी संपर्क करायला कधीच काही अडचण आली नाही. सुदूर केरळमधील मल्याळी भाषा बोलणारे लोक हिमालयात तीर्थयात्रा करत असत आणि काशीचे हिंदीभाषी लोक रामेश्वरम् येथे कावड अर्पण करण्यासाठी जात असत. संपर्कासाठी भाषेवरून इतिहासात भारतात कोणताही मतभेद झालेला दिसत नाही असे भागवत यावेळी म्हणाले.
 
 
इंग्रजी माध्यमांमुळे मुलांच्या बौद्धिक विकासात अडथळा
 
शाळेमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे मुलांच्या मनावर अनावश्यक ओझे वाढते. तसेच त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास थांबतो असे त्यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमामुळे मुले ज्ञानविज्ञानाचे मौलिक चिंतन करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांच्या भल्यासाठी कुटुंबात आणि स्वभाषा बोलणाऱ्या लोकांशी आपण आपल्या भाषेतच बोलून स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे आवाहनही भागवत यांनी यावेळी उपस्थितांना केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121