“राम मंदिर उभारण्याचे काम लवकर व्हावे. म्हणून कारागिरांशी बोलणी सुरू झाली आहे. आता आम्ही माघार घेणार नाही. ही सत्याच्या विजयाची लढाई आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत.” असे चंपत राय म्हणाले.
दगडांनी भरलेले हे ७० ट्रक लवकरच अयोध्येत पोहोचतील. कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर ३ मजली भव्य राम मंदिर उभारता यावे. यासाठी कारागिरांशी चर्चा सुरू असल्याची महिती सूत्रांकडून मिळाली आहे. राम जन्मभूमीकडे जाणारे रस्ते नागरिकांसाठी बंद करण्यात आले असून येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. राम मंदिर बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याविषयी इक्बाल अन्सारी यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. निवडणुकांच्या तोंडावरच विहिंप अशा गोष्टी करते. सरकारने विहिंपला रोखले पाहिजे. अशी टीका इक्बाल अन्सारी यांनी केली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/