जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील धारोळ गाव - वांगणी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
Read More
(Leadership Development Study Class at Mhalgi Prabodhini) देशाच्या सर्वंकष विकासासाठी महानगरांसोबतच छोटी शहरे व ग्रामीण भागाचाही विकास आवश्यक असतो. त्यात तरुण व महिलांची शाश्वत प्रगती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. क्षमता विकास व प्रशिक्षण ही उद्दिष्टे समोर ठेवून गेले दोन दिवस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने संभाजीनगरच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळचे विश्वस्थ, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांसाठी ‘नेतृत्व विकास अभ्यास वर्ग’ आयोजित केला होता.
‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ आयोजित दोनदिवसीय समाजमाध्यम साहित्य संमेलनात समाजमाध्यम, अभिव्यक्ती, समाजमन अशा वेगवेगळ्या विषयांवर सृजनसंवाद घडला. या साहित्य संमेलनाचा थोडक्यात घेतलेला मागोवा...
ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे असलेल्या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’त केवळ जाण्याचीच नाही, तर तीन दिवस तिथे आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या अभिरुची जोपासना कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. या तीन दिवसांत झालेली विविध व्याख्याने, मार्गदर्शन सत्रे यांचा हा वृत्तांत...
नाशिक : “आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. पण, हिंदू धर्मासाठी आपण एक होतो का,” असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड येथे आपल्या व्याख्यानात उपस्थित करून उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. ‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ या देशापुढील सर्वांत मोठ्या समस्या असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. या समस्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला अजूनही समजत नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. ‘अश्वमेध
मुंबई : आषाढ ते कार्तिक या चातुर्मासाच्या कालावधीत भगवान विष्णु निद्रिस्त अवस्थेत जातात. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी ते निद्रिस्त अवस्थेतून बाहेर येतात. या दिवसाला ‘प्रबोधिनी किंवा देवउठणी एकादशी’ असे म्हणतात. मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी हा दिवस संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या दिवशी जसा पंढरपूरात मोठा उत्सव असतो, तसाच कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीच्या ( Tulasi ) दिवशीही असतो.
तरुणांचा देश असणार्या भारतातील तरुण उर्जेला योग्य दिशा आणि ध्येय देण्याचे कार्य गेली ४१ वर्षे अविरत करणारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, आज तिचा ४२ वा स्थापना दिन साजारा करत आहे. या प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक तरुणांनी राष्ट्रसेवेला वाहून घेतले आहे. राष्ट्रभक्त तरुण घडवणार्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्याचा हा आढावा...
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये विदेशी भाषा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून ७ मार्च २०२४ रोजी विद्या विहार येथे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती.
'अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारल्यामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व आनंदाचे वातावरण आहे. मंदिराच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. त्यामुळे रिटर्न गिफ्ट म्हणून हिंदू समाज नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करेल.', असे म्हणत देशभरातून आलेल्या संतांनी 'राम मन्दिर का उपहार, फिर एक बार मोदी सरकार'चा जयजयकार करत पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनाच विराजमान करण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे. (Phir Ek Baar Modi Sarkar)
“महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक प्रकल्पांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्राणपणाने विरोध केला. तरीदेखील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, देशाच्या विकासात अडथळा आणणार्या ‘आंदोलनजीवीं’ची इकोसिस्टीम तोडण्याचीच गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित सुशासन परिषदेतील मुलाखतीत ते बोलत होते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे दिल्ली येथे ९ आणि १० फेब्रुवारी रोजी सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत दिली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महोत्सवास उपस्थित असतील.
'जीवन प्रबोधिनी ट्रस्ट मुंबई'चे संस्थापक सत्यवान अंबरनाथ नर यांची श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट जे. जे. हॉस्पिटल, मुंबई या संस्थेत संस्थेचे 'हितचिंतक' म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र धर्मशाळेचे ट्रस्टी एकनाथ ठाकूर यांनी सत्यवान नर यांना दिले.
'जीवन प्रबोधिनी ट्रस्ट', मुंबई चे संस्थापक सत्यवान अंबरनाथ नर यांची गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट जे. जे. हॉस्पिटल, मुंबई या संस्थेत संस्थेचे “ हितचिंतक " म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र धर्मशाळेचे विश्वस्त एकनाथ ठाकूर यांनी सत्यवान नर यांना दिले.
सर जे जे रुग्णालयात ‘हेल्प डेस्क’ सुरु करा अशी मागणी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट यांनी सर जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सुप्रिया प्रभाकर सापळे यांची भेट घेऊन केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री.प्रशांत पवार,भाऊसाहेब शिंदे ,गिरीश माकवाना ,मुकेश शिंदे,शरद अडागळे हे देखील उपस्थित होते.
अंबरनाथ : मुंबईतील सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’यांच्यावतीने ’घडवू जीवन, करू प्रबोधन’ ही संकल्पना घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ तालुक्यातील धारोळ जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर, संयोजक गणेश पार्टे, मीडिया संयोजक रवींद्र जाधव व शाळेचे मुख्याध्यापक बळवंत शेवाळे, उपशिक्षक शैलेश बिरादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश घुटे, कारा
‘’कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटलाराम जन्मला ग सखे राम जन्मला...!“ प्रभू सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात गुरुवारी नाशिक श्रीरामनगरीत जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील काळाराम मंदिरासह इतर रामाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या संख्यने गर्दी दिसून आली. तर सायंकाळी नाशिकरोड परिसरात भव्य रथयात्रा, शोभायात्रा काढून राम जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा झाला.प्रभूरामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेल्या नाशिक नगरीत आठवडाभरापासून जय्यत तयारी सुरु होती. गुढीप
‘माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी’ या ब्रीदवाक्यानुसार समाजसेवेसोबत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे आणि ‘एनएसएस’च्या माध्यमातून विद्यार्थी घडवणार्या प्रा. भिमराव पेटकर यांचा जीवनप्रवास...
“घराणेशाही ही राजकारणाला लागलेली कीड असून, यामुळे पक्षातील कार्यकर्त्यार्ंचा विकास आणि संघटनेची प्रगती खुंटत जाते. एखाद्याच्या कर्तृत्वासमोर अडथळे आणि आव्हान निर्माण करण्याचे काम हे घराणेशाही करत असते,” असे मत प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे गुरुवार, दि. २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’गुरुवार सभा’ या बौद्धिक मंथन उपक्रमात ते बोलत होते.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक-आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यावेळी डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक - आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या केशव सृष्टी, भाईंदर येथील प्रशिक्षण व संशोधन संस्थेसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. यात प्रशासन प्रमुख, कार्यक्रम अधिकारी, मार्केटींग ऑफिसर, संशोधन प्रमुख आदी पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.
"कुटुंब प्रबोधन गतीविधी" नाशिकरोड गटाच्या वतीने धामणकर सभागृहात दिपावलीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला
सुशासनाच्या रामराज्याचे युग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल १२ वर्षे गुजरात राज्याचे नेतृत्व केले व गेली साडेसात वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. यानिमित्ताने ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ‘डिलेव्हरिंग डेमोक्रसी : रिव्ह्युव्हिंग द टू डिकेड्स ऑफ नरेंद्र मोदी अॅस हेड ऑफ गर्व्हमेंट’ या विषयावर दि.२७ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने याच वर्षी या सरकारचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांच्या शासनप्रमुख म्हणून
भारताच्या दहशतवादविरोधी धोरणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आमूलाग्र बदल घडविल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
परिषदेमध्ये ‘मुख्यमंत्री ते पंतप्रधान’ या प्रवासातील वैशिष्ट्ये, योजनांची यशस्वी अंमलबजावणी, मोदी सरकार आणि सामाजिक, शैक्षणिक विकास, ‘मोदीनॉमिक्स’ संकल्पनेची वैशिष्ट्ये, नवीन शिक्षण धोरण, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पर्यावरणीय समस्यांविषयी मोदी सरकारची दृष्टी, परराष्ट्र धोरणातील यश, कृषी क्षेत्रातील सुधारणा, सामाजिक न्याय व महिला सक्षमीकरण आदी विषयांवर चर्चा तसेच ‘पेपर प्रेझेंटेशन’ होणार आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ, लेखक, विविध माजी राजदूत, सनदी अधिकारी यांचा समावेश आहे.
‘युपीएससी’-‘एमपीएससी’च्या परीक्षा उत्तीर्ण होणे, हे अनेकांचे स्वप्न असते. काही मोजकेच हे स्वप्न पूर्ण करू शकतात. पुण्याच्या मृणाली जोशीने हे स्वप्न वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पूर्ण केले. आता सामाजिक कर्तृत्वाच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात करणारी ही विद्यार्थिनीदुर्गा!
'महाराष्ट्राची सांस्कृतिक तोंडओळख' ही संकल्पना घेऊन चार 'ऑनलाईन' कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. यापैकी तीन ठिकाणी सत्ताधारी पक्ष सत्तेत कायम राहिले, तर दोन ठिकाणी सत्तापालट झाला. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणत्या एका राजकीय पक्षाचे झाले असेल, तर ते भारतीय ‘ग्रॅण्ड ओल्ड पार्टी’चे म्हणजे काँग्रेसचे!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यकारणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे (RMP) ऑगस्ट महिन्यात महाMTB, ऑप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने #Tweet4Bharat नामक पहिली ट्विटर थ्रेड स्पर्धा सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर ट्विट करण्याची स्पर्धा घेण्यात आली. ज्यात सर्वोत्कृष्ट ट्विटला विषयानुसार पुरस्कार जाहीर करण्यात आले.
कर्तृत्व आणि यश हे वारशाने नाही, तर कष्टाने आणि बुद्धिमत्तेने येते. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी दुर्गामातेने जे युद्ध केले किंवा तिच्या इतरही रूपांत करूणामयी किंवा सहनशीलतेच्या अनुभूती जपताना, देवीने जो समन्वय राखला आहे, तो संघर्ष आणि समन्वय आजही प्रत्येक महिला शक्तीमध्ये आहे. जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतीलही, पण त्यातील आंतरिक जाणिवा मात्र कुठे ना कुठे तरी समान असतात. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना या आंतरिक जाणिवेची प्रेरणा जागृत असावी, हे सांगून आपल्या जीवनातील तो संघर्ष आणि समन्वय
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे #Tweet4Bharat या स्पर्धेचे आयोजन
म्हाळगी प्रबोधिनीतील शिबीर रद्द केल्यानंतर अॅड, आशिष शेलार यांची टीका
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 'न्यु इंडिया स्टार्टअप कॉनक्लेव्हचे आयोजन
‘संवाद’ ही मानवजातीची प्रभावी शक्ती मानली जाते. मात्र, काही कारणांनी अनेक जण या संवादशक्तीपासून दूर राहतात. या शक्तीपासून वंचित असलेल्या कर्णबधिर मुलांना संवादाचे धडे देण्याचा ध्यास डोंबिवलीतील ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ या शाळेने घेतला आहे.
मायानगरी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हजारो मुले महाराष्ट्रातून तसेच परराज्यांतून विविध कारणांसाठी दाखल होतात. त्यांची न कुठे दखल, ना कुणाला चिंता...
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बौद्धिक क्षमतेइतकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहेत ती जीवनावश्यक कौशल्ये!
आर्य चाणक्यांनी इ.स.पूर्व चौथ्या शतकामध्ये एका समर्थ राष्ट्राच्या उभारणी केली होते. राष्ट्रहितासाठी आवश्यक अनेक विषयांवर त्यांनी काळी चर्चा केली होती. जी आजही तंतोतंत लागू पडते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुणे केंद्राचे संचालक यशवंत ठकार यांचे रविवारी पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले