शाश्वततेच्या दृष्टीने सर्वांना जागरूक होण्याची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक हवामान बदल जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

    05-Jun-2025
Total Views | 8
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : आज शाश्वततेच्या दृष्टीने आपल्या सर्वांना जागरूक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार दि. ४ जून रोजी केले.
 
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भामला फाउंडेशन यांच्या वतीने वांद्रे (पश्चिम) येथील कार्टर मार्गावरील अ‍ॅम्फी थिएटर येथे ‘जागतिक हवामान बदल जनजागृती मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला, अभिनेत्री रविना टंडन, स्वानंद किरकिरे, गोव्याचे वाहतूक मंत्री मौविन गोडिन्हो, आमदार राम कदम यांच्यासह विविध अभिनेते, अभिनेत्री आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  सोलापुरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज शाश्वततेच्या दृष्टीने आपल्या सर्वांना जागरूक होण्याची गरज आहे. ज्या वेगाने आपण वातावरण बदलाचा अनुभव घेत आहोत त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त शाश्वतता आणण्याच्या दिशेने पाऊल उचलायला हवे."
 
आसिफ भामला यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे. ते केवळ पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आयोजित करत नाही तर पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीचे कामही करतात. यावेळी प्लास्टिक कसे संपवता येईल ही पर्यावरण दिनाची थीम आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची खूप हानी होत आहे. त्यामुळे आपण कमीत कमी प्लास्टिक वापरू आणि जे वापरू त्याचा पुनर्वापर करण्याचा निश्चय आपण करूया. महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्लॅस्टिकच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. मागच्या वेळी मी मुख्यमंत्री असताना एकल प्लास्टिक वापरला बंदी घातली होती. प्लास्टिकला नवीन पर्याय शोधून प्लास्टिकविरोधी मोहीम वर्षभर आम्ही ही चालवणार आहोत," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "आजच आम्ही यावर्षी महाराष्ट्रात १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून तीन महिन्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही एक इकोसिस्टिम तयार करत आहोत. महाराष्ट्रात मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात समुद्रात सांडपाणी जाते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. येणाऱ्या तीन ते चार वर्षात समुद्रात केवळ प्रक्रिया केलेलेच पाणी जाईल आणि समुद्र स्वच्छ राहील, अशी अपेक्षा आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेट झिरो हा संकल्प केला असून त्याद्वारे २०३० पर्यंत आपल्या एकूण उर्जेच्या ५० टक्के ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्तोत्रातून येईल, असे उद्दिष्ट ठेवले आहे. २०३० पर्यंत महाराष्ट्रातील एकूण ऊर्जेपैकी ५२ टक्के ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्त्रोत्रातून येईल, असा विश्वास आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत शेतीकरिता येणारी वीज ही अक्षय ऊर्जा स्त्रोत्रातून येईल यादृष्टीने आम्ही काम सुरू केले आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हरीत वाहतूक सेवेवर भर 
 
"यासोबतच ग्रीन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. २०३० पर्यंत मुंबईतील संपूर्ण वाहतूक सेवा ही हरित होईल, असे मला वाटते. आपण कोणत्याही इंधनाचा वापर न करता मुंबईच्या लोकांना १०० टक्के हरित वाहतूक सेवा उपलब्ध करून देऊ. तसेच यावर्षी सर्व वाहतूक सुविधांना आपण एकाच प्लॅटफॉर्मवर आणत आहोत. यापुढे एकाच तिकिटाद्वारे आपण कोणत्याही मार्गाने प्रवास करू शकणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121