उद्धव ठाकरेंची टीका! मुख्यमंत्री फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

    20-Jun-2025
Total Views | 89


जळगाव : गुरुवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. शुक्रवार, २० जून रोजी जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेचा ब्रँड पुसाल तर तुमचे नामोनिशान मिटवून टाकेल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही. हे बोलबच्चन आहेत आणि त्यांना मी उत्तर देत नाही," असे ते म्हणाले.


"भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आदिवासी समाजाचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या अमृतकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा गौरव झाला पाहिजे यादृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले. खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा सहभाग होता. त्यामुळे मागच्या काळात मी या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. आता त्याचे उद्धाटन करण्याचीही संधी मिळाली याचा आनंद आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला दि.१६ जुलै रोजी येमेन येथे होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका ‘सेव्ह निमिषा प्रिया अ‍ॅक्शन कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडून दाखल करण्यात आली आहे. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी याचिकेत बाजू मांडताना म्हटले की, “शरीयत कायद्यानुसार ही फासी रोखता येते. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष्य देण्याकरीता आपण निर्देश द्यावे.” अशी विंनती त्यांनी न्यायालयासमोर केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121