"स्वातंत्र्यानंतर जवळपास सात दशकं उलटली, पण दुर्दैवाने..."; चित्रा वाघ यांचे प्रतिपादन

    03-May-2025
Total Views | 21
 
Chitra Wagh
 
मुंबई : जातीनिहाय जनगणनेबाबत काँग्रेसने कायम जनतेला गाजरच दाखवलं. स्वातंत्र्यानंतर जवळपास सात दशकं उलटली, पण दुर्दैवाने जातनिहाय जनगणना देशात कधीच संपूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने झाली नाही, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "मोदीजींनी मंत्रिमंडळात जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जातनिहाय जनगणना हा केवळ आकड्यांचा विषय नाही, तर देशातील मागास, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचं, देशाच्या न्यायसंगत विकासासाठी, गरजूंना हक्काचा वाटा मिळवून देण्यासाठी उचललेलं निर्णायक पाऊल आहे. याबाबत काँग्रेसने कायम जनतेला गाजरच दाखवलं. स्वातंत्र्यानंतर जवळपास सात दशकं उलटली, पण दुर्दैवाने जातनिहाय जनगणना देशात कधीच संपूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने झाली नाही," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? - तनिषा भिसेंच्या बाळांसाठी मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात! उपचारासाठी तब्बल २४ लाखांची मदत
 
काँग्रेस सरकारच्या पाहणीत हजारो चुका!
 
"२०१० मध्ये काँग्रेस सरकारने लोकसभेत तोंडी आश्वासन दिलं. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ गट स्थापन करण्यात आला. पण नंतर तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जनगणनेत जात नोंदवण्यास स्पष्ट विरोध केला होता. जातनिहाय जनगणना स्वतंत्रपणे करू असं जाहीर करूनही प्रत्यक्षात काँग्रेस सरकारने ती कधीच केली नाही. त्याऐवजी करण्यात तथाकथित सामाजिक-आर्थिक आणि जात पाहणी (SECC) केली आणि त्यावर ४ हजार ८९३ कोटी रुपये खर्च केले. पण त्या पाहणीत हजारो चुका होत्या आणि जातनिहाय आकडेवारी पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली. हा सारा प्रकार ‘पाहणी केली’ दाखवून गाश्यात गुंडाळून ठेवण्यात आला," असे त्या म्हणाल्या.
 
"काँग्रेस आणि त्यांच्या इंडिया आघाडीतील पक्षांनी या मुद्द्याचा केवळ मतांसाठी वापर केला. सामाजिक न्याय आणि समान हक्क हे विषय भाषणाचे नाही तर कृतीचे विषय आहे. अंत्योदय हेच मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे हे पुन्हा एकदा मोदीजींनी सिद्ध केलं," असे म्हणत चित्रा वाघ यांनी मोदी सरकारचे आभार मानले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121