नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे फक्त भारत-पाकिस्तान संबंधांमध्येच नव्हे, तर भारत-तुर्की आणि अझरबैजान या देशांशी असलेल्या संबंधांमध्येही बदल होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभं राहिलं. तुर्की मात्र पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसले. इतकच नव्हे, तर तुर्कीने बनवलेल्या ‘सोंगर ड्रोन’चा वापर पाकिस्तानने भारताच्या लष्करावर आणि सामान्य नागरिकांवर हल्ला करणायासाठी केला.
या कृत्यामुळे भारतीय व्यापार जगतात तुर्की आणि अझरबैजान या देशांवर बहिश्कार टाकताना दिसून येत आहेत. भारतीय व्यापारी आणि इतर नेते या निर्णयाचे सोशल मिडीयावर समर्थन करताना दिसत आहेत.
पुण्यातील सफरचंद व्यापारी म्हणाले, तुर्की पाकिस्तानला समर्थन करत आहे, त्यामुळे आम्ही आता तुर्कीकडून सफरचंद खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आम्ही हिमाचलसारख्या भारतीय भागामधून सफरचंद खरेदी करू.
अनेक भारतीयांनी तुर्कीला प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही पर्यटकांनी तुर्कीऐवजी ग्रीसला प्रवास करण्याचा निर्णय घेत आहेत. भारतामध्ये गोव्याला सर्वाधीक तुर्की पर्यटक आढळतात. ‘गोवा व्हिलाज’ या हॉटेलन तुर्की पर्यटकांना राहण्याची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर सर्व तुर्की पर्यटकांनी भारताबाहेर पडावे असे आवाहन सोशल मिडीयावर चालू असल्याचे दिसून येते.