वक्फ बोर्डाला दणका; कोर्टाने दावा फेटाळला!

७४ वर्षांनंतर सरकारला ९६ बिघा जमीन परत मिळणार

    25-Sep-2024
Total Views | 309

Waqf Board claim rejected

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Waqf Board Claim Rejected)
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशच्या डीडीसी कोर्टाचा मोठा निर्णय आला आहे. कौशांबी जिल्ह्यातील कडाधाम परिसरात वक्फ बोर्डाची ९६ बिघा जमीन सरकारी खात्यात नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला होता. गेली ७४ वर्षे यासंबंधीचा वाद डीडीसी कोर्टात सुरू होता. तपासाअंती ९६ बिघे जमिनीची सरकारी खात्यात नोंद करावी, असा आदेश न्यायालयाने दिला.

हे वाचलंत का? : 'तिरंगा रॅली'च्या नावाखाली जिहाद्यांचा उन्माद!

आदेशानंतर जमीन मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या कारवाईबाबत केंद्र सरकारलाही कळविण्यात आले आहे. कौशांबी जिल्ह्यातील सरकारी वकिलांनी एक प्रस्ताव तयार करून केंद्राकडे ४ मुद्यांवर सूचना पाठवल्या होत्या. कौशांबीचे जिल्हा दंडाधिकारी मधुसूदन हुलगी यांनी सांगितले की, वक्फ बोर्डाने जमिनीवर दावा केला होता. जमिनीबाबतचा खटला १९४६ पासून प्रलंबित होता. सन २०२२ मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (न्यायिक) यांनी या जमिनीची सरकारी खात्यात नोंद केली होती. आता ही जमीन सरकारची आहे. ती आता ताब्यातून सोडली जात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121