महिलांच्या मनात असलेली भीती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय : उपराष्ट्रपती धनखड

    31-Aug-2024
Total Views |
vice president jagdeep dhankhar


नवी दिल्ली :         आपल्या कन्या आणि महिलांच्या मनात असलेली भीती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. तसेच, सर्व महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे उपराष्ट्रपतींनी आवाहन करताना महिलांवरील हिंसाचाराला ‘लक्षणात्मक आजार’ म्हणून संबोधले गेल्याचे सांगताना उपराष्ट्रपतींनी तीव्र निषेध केला आहे.

दरम्यान, दिल्ली विद्यापीठाच्या भारती महाविद्यालयात ‘विकसित भारतातील महिलांची भूमिका’ या विषयावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “मी अवाक झालो आहे; सर्वोच्च न्यायालयाचा बार सदस्य, खासदार अशा पद्धतीने वागतो याचे मला दुःख आणि काहीसे आश्चर्य वाटते. किती लज्जास्पद आहे! अशा भूमिकेचा निषेध करण्यात माझे शब्द अपुरे आहेत. हा त्या उच्च पदासमवेत सर्वात मोठा अन्याय आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींच्या “बास आता खूप झाले” या आवाहनाचा पुनरुच्चार करण्याचे आवाहन नागरिकांना करून धनखड म्हणाले, “राष्ट्रपतींनी सांगितले आहे, बास आता खूप झाले!” चला, पुरे झाले म्हणूया. हे आवाहन राष्ट्रीय आवाहन व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाने या आवाहनात सहभागी होत चला संकल्प करूया, एक व्यवस्था निर्माण करूया, यापुढे, एखाद्या मुली किंवा महिलेवर अत्याचार करणाऱ्याला थारा नसेल, सहिष्णुता नसेल, असेही ते यावेळी म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
पुढील १० वर्षात, भारतामध्ये ₹२.५ ते ₹३ लाख कोटी भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एमआयटी-डब्ल्यूपीयू मध्ये घोषणा

पुढील १० वर्षात, भारतामध्ये ₹२.५ ते ₹३ लाख कोटी भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एमआयटी-डब्ल्यूपीयू मध्ये घोषणा

भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील १० वर्षांत ₹२.५ ते ₹३ लाख कोटींच्या टनेल (भुयारी मार्ग) प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी दिली. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथे आयोजित ‘सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते...

शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा निवडणुकीची जबाबदारी - मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मुंबई पालिकेतील शिक्षकांची नेमणूक

शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा निवडणुकीची जबाबदारी - मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मुंबई पालिकेतील शिक्षकांची नेमणूक

शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, यासाठी त्यांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार नसून, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ही जबाबदारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121