भारतात हिंदु राष्ट्र घोषित करून समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा! : मुन्ना कुमार शर्मा

    02-Aug-2024
Total Views |

Munna Kumar Sharma

मुंबई (प्रतिनिधी) :
भारत हे हिंदु राष्ट्र (Hindurashtra) होते, आहे आणि भविष्यातही असेल. केंद्र सरकारने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केली. अखिल भारतीय हिंदु महासभेने संपूर्ण देशामध्ये जागरूकता अभियान चालू केले आहे.

हे वाचलंत का? : यशश्री शिंदे-अरविंद वैश्यच्या हत्येच्या निषेधार्थ सातारा बंद!

यासह देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, गोहत्या बंदी कायदा करावा, मंदिरांच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी ‘टेंपल ॲक्ट’ संपुष्टात आणावा, ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करावा, हिंदु साधू-संतांचे रक्षण व्हावे आणि हिंदु मंदिरांचे पावित्र्य अन् विकास यांवर लक्ष केंद्रित करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

या मागण्या मान्य न झाल्यास देशभर जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. या परिषदेला हिंदु महासभेचे महामंत्री सुनील कुमार, राष्ट्रीय कार्यालय मंत्री वीरेश त्यागी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.