मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत नाना पटोलेंची एन्ट्री! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

    06-Jul-2024
Total Views |
Nana Patole MCA

मुंबई :
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे नुकतेच हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे एमसीएत अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इन्ट्री केली आहे. पटोलेंनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान दि. २३ जुलै रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे एमसीएच्या निवडणुकीत त्यांना मतदाना हक्क बजावता येणार आहे. त्यामुळेच पटोले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दि. २ जुलै रोजी त्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात महत्त्वाची असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक रंगतदार होणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई ..

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121