गांधी आडनाव वगळा; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

    12-Sep-2023
Total Views | 50

himta biswa sarma


नवी दिल्ली :
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी काँग्रेसच्या गांधी कुटुंबावर आडनाव बळकावल्याचा आरोप करतानाच गांधी आडनाव वगळा, असा सल्ला दिला. रविवार, दि. 10 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथील भाजप मुख्यालयात एका कार्यक्रमात सरमा यांनी राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, “सगळे गांधी कसे झाले? मी बरेच दिवस संशोधन केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे कोणत्या सूत्रानुसार गांधी आहेत? भाजपला ‘भारत’ नावाची भीती वाटते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. उद्या एखाद्या डाकूने आपले नाव बदलून गांधी केले, तर तो संत होईल का?“ असा सवाल मुख्यमंत्री सरमा यांनी राहुल गांधींना केला.

“गांधीजींनी देश स्वतंत्र केला आणि तुम्ही लोकांनी गांधी, ही पदवी धारण केली. भारताचा पहिला घोटाळा एका टायटलपासून सुरू झाला. तुम्ही लोक ‘डुप्लिकेट गांधी’ आहात. टायटलप्रमाणे काँग्रेसने आपल्या देशाचे नाव बळकावले आणि ‘इंडिया’ झाले. जेव्हा मते घेण्याची वेळ येते, तेव्हा काँग्रेस ‘भारत जोडो यात्रा’ काढते. निवडणुका संपल्या. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव बदलून ‘इंडिया’ केले,” अशी टीका सरमा यांनी केली.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121