रा. स्व. संघाची त्रिदिवसीय प्रतिनिधी सभा

    13-Mar-2023
Total Views | 89
akhil-bhartiya-pratinidhi-sabha-of-rashtriya-swayamsevak-sangh

पानिपत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्रिदिवसीय प्रतिनिधी सभा हरियाणातील समालखा येथे रविवार, दि. १२ मार्चपासून सुरू झाली आहे. दि. १४ मार्चपर्यंत चालणार्‍या या शिबिरात संघाच्या शताब्दी वर्ष विस्तार योजनेंतर्गत २०२२-२३च्या कार्यांचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी वर्षातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवून त्यावर चर्चा केली जाणार आहे.

२०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या दृष्टीनेही संघाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रतिनिधी सभेच्या शुभारंभाला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या प्रतिनिधी सभेत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह १४७४ पदाधिकारी भाग घेणार आहेत. तीन दिवसांमध्ये विश्व हिंदू परिषदेसह संघाशी जोडल्या गेलेल्या ३४ संघटनांचे पदाधिकारी या त्रिदिवसीय प्रतिनिधी सभेत सहभागी होणार आहेत. संघाच्या प्रतिनिधी सभेच्या शुभारंभानंतर सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, “२०२५ मध्ये संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून सद्य:स्थितीत ७१ हजार, ३५५ ठिकाणी संघाचे कार्य पोहोचले असून पुढील वर्षात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे आमचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई ..

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121