खडसेंचे पक्षांतर्गत खच्चीकरण!

जिल्हा बँकेत बसलेला फटका जिव्हारी

    12-Mar-2023
Total Views | 208
Eknath Khadse


मुंबई
: भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीतच खच्चीकरण सुरू झाले असून त्यातुनच जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसेंच्या विरोधी गटातील संजय पवार यांची निवड झाली. हा पराभव एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागल्याचे म्हटले जात आहे.
 
खडसे यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादीला लाभ होईल असे सांगत त्यांची विधान परिषदेत गटनेते पदी वर्णी लावण्यात आली. त्यास काही तास उलटत नाहीत तोच त्यांना पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खडसेंच्या विरोधी गटातील संजय पवार यांची निवड झाली आहे. त्यामुळे हा खडसेंसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे समर्थक संजय पवार यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे मानले जात होते, त्यानुसार अध्यक्षपदासाठी पक्षाकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी संजय पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

या बंडखोरीचा मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ खडसे यांना बसला आहे. संजय पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक संजय पवार विरूद्ध रवींद्र पाटील अशी झाली. या निवडणुकीत संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव केला आहे. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान संजय पवार यांच्या विजयामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. संजय पवार हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. रवींद्र पाटील यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121