गोवा विजयानंतर राज्यातल्या राजकारणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दरारा वाढल्याच पहायला मिळालं. त्याच दरम्यान महाविकास आघाडीला नवाब मलिकांच्या रजिनाम्यासाठी फडणवीसांनी धारेवर धरलं. यात मलिकांना अटक ही झाली. राज्य सरकारला मलिकांची मंत्रीपदं काढून घ्यावी लागली. यामुळं एकापाठोपाठ एक विजय मिळवणाऱ्या फडणवीसांची राष्ट्रीय पातळीव चर्चा होताना दिसतीये. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत करिष्मा घडवून आणण्यासाठी देवेंद्र अँड टीम पुर्ण ताकदीने उतरलीये. मागच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला आमदारकीची एकही जागा कोल्हापूरात मिळाली नाही. त्यामुळं ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलीये. निवडणूकीच्या रणांगणातून देवेंद्र फडणवीसांनी वेळ काढत सांगलीतील बिरोबा मंदिराला भेट दिली. आरेवाडीत यात्रेनिमित्त चार राज्यातून भाविक जमतात. आरेवाडीला देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. या भेटीचा भविष्यातल्या समीकरणावर काय परिणाम होऊ शकतो यावर हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
पश्चिम महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा 'गेट वे' उघडणार
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला २०१४ ला अभुतपुर्व यश मिळालं. अनेक बड्या मातब्बर नेत्यांचा पराभव करत भाजपनं झेंडा रोवला. कारखानदारी बुरुज ढासळून भाजपचं कमळ फुलताना दिसत होतं. यानंतर जिल्हा परिषदांपासून मनपापर्यंत भाजपनं मोठं यश मिळवलं. राष्ट्रवादीला बसलेला हा सेटबॅक महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण कायमस्वरुपी बदलणारा होता. परंतू २०१४ च्या तुलनेत २०१४ ला भाजपला पश्चिम महाराष्ट्रात कमी यश मिळालं. मराठा आरक्षणाची यशस्वी अंमलबजावणी करुनही भाजपच्या कमी झालेल्या जागा चर्चेचा विषय बनला होता. याला अनेक कारणं असली तरी २०१४ ला धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आघाडीच्या विरोधात गेलेला बहूसंख्य ओबीसी आणि प्रामुख्यानं धनगर समाज आपल्याकडे वळवण्यात थोड्याफार प्रमाणात राष्ट्रवादीला यश आलं.
आता ओबीसी आरक्षणाचा उडालेला फज्जा, महाज्योती संस्थेचा अनियमित कारभार, धनगर समाजासाठी लागू फडणवीसांनी लागू केलेल्या योजनांची न झालेली अंमलबजावणी या मुद्द्यांवरुन आघाडीविरोधी मत धनगर समाजासह ओबीसींमध्ये बळ घेतंय. या मताल अधिक दृढ बनवण्यासाठी, धनगर समाजासोबत असल्याची भावना निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आरेवाडीला यात्रेनिमित्त भेट दिल्याचं बोललं जातंय. धनगर समाजातील मोठा घटक आजही विकासाच्या मुख्यप्रवाहापासून दुर आहे. या मागच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेतृत्त्व तयार करण्यात धनगर समाजाला आलेलं अपयश. सद्याच्या परिस्थीतीत गोपिचंद पडळकरांना यासाठी फडणवीस तयार करताना दिसत आहेत. पडळरांच्या माध्यमातून फडणवीस धनगर समाजाला आश्वासक नेतृत्त्वाचा चेहरा देऊ पाहतात. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात गेमचेंजर ठरणाऱ्या धनगर समाजात भाजप नेतृत्त्वाविषयी आस्था निर्माण व्हावी आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा स्ट्रॉंग होल्ड निर्माण करण्यासाठी आजची फडणवीसांची आरेवाडी भेट महत्त्वाची मानली जातीये.
नव्या सोशल इंजनिअरिंगची सुरुवात
बिरोबा दर्शन घेतल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे, या प्रतिक्रियेत त्यांनी सर्वसमावेशक बिरोबाची महती सांगितली ते म्हणाले, "बिरोबा हा दलितांचा बहूजनांचा देव आहे. प्रत्येकाची मनोकामना पुर्ण करणारा देवंय. त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आत्मिक आनंद प्राप्त होतो. प्रत्येक सामान्य माणसात बसलेल्या ईश्वराचं दर्शन, त्याचं दर्शन घेण्याची संधी मिळाली मी स्वतःला नशिबवान मानतो. "
शरद पवार आणि पर्यायानं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पवारांनी खुल्या मंच्यावरुन फडणवीसांची तुलना पेशव्यांशी केली होती. भाजपा हा शहरी, उद्योजकांचा आणि विशेष जात समुहाचं नेतृत्त्व करणारा पक्ष असल्याच चित्र राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात निर्माण केल्याचं बोललं जातं. त्यामुळं या नरेटीव्हला संपवून सामान्यांशी थेट संबंध असल्याचा संदेश द्यायला फडणवीस आरेवाडीत आल्याचंही बोललं जातं. शिवाय मेंढपाळांवरील हल्ले, महामेष योजना लागू न होणं, विकास निधी आडवला जाणं यामुळं धनगर समाजातील आक्रोशाला आवाज देण्यासाठी आणि राजकीय असुरक्षिततेल्या भावनेला संपवण्यासाठी आरेवाडी दौरा महत्त्वाचा ठरेल असं स्थानिक नेत्यांचं म्हणनं आहे.
आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना बिरोबा देवस्थानासाठी ५ कोटी मंजूर केले होते. यापैकी काही काम झालं. गोपिचंद ने सांगितं की १६५ कोटींचा विकास आराखडा तयार आहे. राज्य सरकारकडे पाठपुराव करुच. पण विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून केंद्राची मदत आणू. महाराष्ट्रापुरता बिरोबा मर्यादित नाही. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यातून लोक इथं दर्शनासाठी लोक येतात त्यामुळं राष्ट्रीय ख्यातीच्या या मंदिरासाठी केंद्र मदतीला सकारात्मकता दाखवेल."