२६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2022
Total Views |

Narendra Modi
 
 
 
नवी दिल्ली : साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून केली आहे.
 
 
 
 
  
ट्विट्सच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
 
 
"आज, श्रीगुरु गोविंद सिंगजींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र दिवसानिमित्त, मला हे सांगताना गौरव वाटत आहे की या वर्षापासून, २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' पाळला जाईल. साहिबजादेंच्या न्यायासाठीच्या लढ्याला आणि धैर्याला ही समर्पक श्रद्धांजली आहे.
 
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना भिंतीत जिवंत बंद करण्यात आल्यामुळे ज्या दिवशी हौतात्म्य प्राप्त झाले त्याच दिवशी ‘वीर बाल दिवस’ असेल. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांपासून विचलित होण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले.
 
माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सलोखा असलेल्या जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती कळणे ही काळाची गरज आहे.”
 
 
 
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. "श्री गुरू गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा. त्यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना बळ देतात. त्यांच्या ३५० व्या प्रकाश उत्सवाची संधी आमच्या सरकारला मिळाली त्याचा आनंद कायम स्मरणात राहील. पाटणा येथील माझ्या भेटीच्या काही आठवणी शेअर करत आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@